दिल्ली | Delhi
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
मागील वर्षी १५ जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झडपेत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं. यानिमित्त भारतीय लष्कराने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वो है गलवान के वीर… या गीताद्वारे गलवान खोऱ्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.