नवी दिल्ली -
नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या देन महिन्यांपासून शेतकर्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी
दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता बजेटच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
भारतीय किसान युनियनचे बलबिरसिंग राजेवाल म्हणाले, प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर आता 1 फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आंदोलनांतर्गंत शहीद दिनी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत.