नवी दिल्ली -
भारतात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात भारताचा रिकव्हरी रेट हा 84 टक्के झाला आहे अशी माहिती
केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली आहे. मागील दोन आठवड्यात देशभरातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ही दहा लाखांच्या खाली आली आहे असंही त्यांनी सांगितलं.
दररोज करोना पॉझिटिव्ह होणार्या रुग्णांचं प्रमाण कमी होतं आहे. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांमध्ये नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यापेक्षा करोनामुक्त होणार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट हा 84 टक्क्यांवर पोहचला आहे असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.