दिल्ली | Delhi
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत होता. मात्र गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ५९३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ३४ हजार १६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २५ लाख १२ हजार ३६६ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १७ लाख ५४ हजार २८१ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख २२ हजार ३२७ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३५ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)
राज्यात मंगळवारी ४ हजार ३५५ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४ हजार २४० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार ०३४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. राज्यात मंगळवारी ११९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याने राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.