अण्णांच्या मागण्यांसदर्भात केंद्राचा समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव

माजी मंत्री महाजन यांनी घेतली भेट
अण्णांच्या मागण्यांसदर्भात केंद्राचा समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव

अहमदनगर -

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी विधेयकाबाबत आंदोलनाचा इशारा दिला असून तेव्हापासून भाजपाचे नेते गॅसवर आहेत दरम्यान, आता

केंद्र सरकारने अण्णा हजारे यांच्या विविध मागण्यांसंबंधी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धीत येथे हा प्रस्ताव हजारे यांच्यासमोर ठेवला.

या प्रस्तावाचा अभ्यास करून भूमिका जाहीर करण्यासाठी हजारे यांनीही तिघांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती अभ्यास करून हजारे यांना केंद्र सरकारच्या प्रस्तावाबद्दल तपशील आणि मत सादर करणार असून त्यानंतर हजारे आंदोलानासंबंधी आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. तूर्त तरी सरकारच्या प्रस्तावावर काहीही निर्णय झाला नसल्याचे हजारे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com