एअर स्ट्राईक! म्यानमारमध्ये संघर्ष पेटला; २ हजार लोक मिझोरममध्ये आश्रयासाठी घुसले

एअर स्ट्राईक! म्यानमारमध्ये संघर्ष पेटला; २ हजार लोक मिझोरममध्ये आश्रयासाठी घुसले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

म्यानमार या देशाने (myanmar) भारताच्या सीमेलगत (India Border) बंडखोरांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक (Air Stike) केला आहे. या एअर स्ट्राईकनंतर मिझोराममध्ये हाय अलर्ट (High Alert In Mizoram) जारी करण्यात आला. जवळपास २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरममध्ये आल्याचे चम्फाई जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

म्यानमारने एअर स्ट्राईक केला असून या हवाई हल्ल्यामध्ये किती बंडखोर मारले गेले आहे याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. म्यानमारने हल्ला केला तेव्हा या बंडखोरांनी भारत - म्यानमार सीमेवर तळ ठोकले होते. सध्या म्यानमारमधली परिस्थीती अतिशय बिकट होत चालली असून रविवारी संध्याकाळी म्यानमारचे सत्ताधारी जुंटा-समर्थित सैन्य आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्यात जोरदार गोळीबार झाला, असे जिल्हाधिकारी जेम्स लालरिंचना यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. पीडीएफने भारतीय सीमेजवळ असलेल्या म्यानमारच्या चिन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला. यानंतर चकमक सुरु झाली.

एअर स्ट्राईक! म्यानमारमध्ये संघर्ष पेटला; २ हजार लोक मिझोरममध्ये आश्रयासाठी घुसले
वडेट्टीवारांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून गंभीर दखल; धमकी देणाऱ्यांवर होणार कारवाई

सरकारविरोधी बंडखोरांनी १०० लष्करी चौक्यांवर कब्जा केला आहे आणि सरकार मुख्य सीमा क्रॉसिंगवर नियंत्रण गमावत आहे जे जवळजवळ सर्व सीमापार व्यापाराला परवानगी देते. येथे करांचा वाटा ४०% आहे आणि एक महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. चीनने दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनने म्यानमारच्या दुर्गम भागात अब्जावधी डॉलर्सची ऊर्जा पायाभूत सुविधांची गुंतवणूक कायम ठेवली आहे.

दरम्यान, गोळीबारामुळे शेजारच्या खवमावी, रिखावदार आणि चिन या गावांतील २००० हून अधिक म्यानमार नागरिकांनी भारतीय सीमा ओलांडून मिझोरामध्ये आश्रय घेतला आहे. पीपल्स डिफेन्स फोर्सने सोमवारी पहाटे म्यानमारच्या रिखावदार लष्करी तळावर ताबा मिळवला आणि दुपारपर्यंत खवमावी लष्करी तळावरही नियंत्रण मिळवले.

एअर स्ट्राईक! म्यानमारमध्ये संघर्ष पेटला; २ हजार लोक मिझोरममध्ये आश्रयासाठी घुसले
मुंबईसह राज्यात हवा प्रदुषणात वाढ !

प्रत्युत्तरादाखल म्यानमार लष्करानेही सोमवारी खावमावी आणि रिखावदार गावांवर एअर स्ट्राईक केला. या गोळीबारात जखमी झालेल्या किमान १७ जणांना उपचारासाठी चंफई येथे आणण्यात आले. जोखावथर येथे म्यानमारच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला असून सीमेपलीकडून आलेल्या गोळीने तो जखमी झाला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांने माहिती दिली की, बंडखोरांसोबतच्या वाढत्या संघर्षामुळे सुमारे ९०,००० लोक विस्थापित झाले आहेत. शान राज्यात सुमारे ५०,००० लोक विस्थापित झाले आहेत, ज्या भागात गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू आहेत आणि काही चीनमध्ये गेले आहेत. शेजारच्या सागिंग प्रदेश आणि काचिनमध्ये संघर्षांमुळे ४०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com