<p><strong>लखनौ - </strong></p><p>अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लखनौचे विशेष सीबीआय न्यायालय उद्या (30 सप्टेंबर) निर्णय देणार आहे. न्यायालयाने सर्व </p>.<p>32 मुख्य आरोपींना कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.</p><p>दरम्यान, न्यायालयाने सुनावणीसाठी ज्येष्ठ नेत्यांना अनुपस्थित राहण्यास सूट दिली आहे. यात लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर काही नेत्यांचा समावेश आहे. या आधी 22 ऑगस्टला सुनावणीचा कालावधी एक महिन्याने वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. सीबीआयने आरोपींविरोधात 351 साक्षीदार आणि 600 दस्तऐवज सादर केले आहेत. तसेच 400 पानी युक्तिवादही दाखल केला आहे. राम मंदिराच्या जागेवर बाबरी मशीद बांधल्याचा दावा करत डिसेंबर 1192 मध्ये कारसेवकांनी ती पाडली होती.</p>