<p><strong>नवी दिल्ली - </strong></p><p>दिल्लीत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार करणार्या शेतकर्यांवरील दिल्ली पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे </p>.<p>केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.</p><p>शेतकर्यांच्या कृतीमुळे दिल्ली पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले व जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला असे गृहमंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.</p><p>शेतकर्यांच्या आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही. कोविड-19 चे निर्बंध असतानाही, चेहर्यावरील मास्कशिवाय मोठया प्रमाणावर शेतकरी जमा झाले होते, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.</p><p> शेतकरी सरकारी मालमत्तेचे नुकसान करत होते, त्यावेळी पोलिसांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता असे गृहमंत्रालयाने ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान पोलिस कारवाईच्या प्रश्नावर सांगितले.</p>