नवी दिल्ली |New Delhi -
दिल्लीत स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) होणार्या सोहळ्यावरही करोनाचे संकट घोंगावत आहे. करोनामुळे यंदा स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष खबरदारी घेत तयारी सुरु आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेणार्या तब्बल 350 पोलिसांना रविवारी क्वारंटाईन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना क्वारंटाईन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.