पाकिस्तानी घुसखोरांचा कट उधळला, ३ जवान शहीद

दोन दहशतवाद्यांचा खात्मा
File Photo
File Photo

जम्मू-काश्मीर l Jammu-Kashmir

भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी घुसखोरांचा कट उधळला आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या बाजूने माचिल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना सैन्याने दोन दहशतवाद्याला ठार केले. मात्र, या कारवाईत तीन जवान शहीद झाले आहे.

नियंत्रण रेषेवर झालेल्या कारवाईत एका लष्करी अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आलं. कुपवाडा जिल्ह्यातल्या मचिल क्षेत्रात हा हल्ला झाला. लष्कराच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला आहे.

श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आवाहन दिलं. मात्र तो शरण आला नाही. त्याने गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून कडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

गुप्तहेर आणि सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी वाढू लागली आहे. पुढच्या काही दिवसांत खोरे पार करणे अवघड होणार असल्यामुळे घुसखोर आताच सीमा ओलांडण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यही दक्ष असून आम्ही घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com