<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) -</strong> </p><p>शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हणतात. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच चर्चा </p>.<p>राज्यसभेत सुरू असताना पवार गैरहजर का राहिले असतील?, असा खोचक सवाल कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. शरद पवार हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांनी असे म्हटले की, कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टिमला विरोध आहे, विधेयकाला नाही, अशी टीका त्यांनी केली.</p><p>नगरमध्ये बुधवारी पटेल हे आले असता त्यांनी पत्रकारंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असणार्या शेतकरी आंदोलनावरून विरोधकांचा चांगला समाचार घेतला. कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडला तर कुठेच भारतात शेतकर्यांचा उद्रेक झाला नाही, असे सांगतानाच पटेल म्हणाले, जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात. पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत, उलट शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केवळ पंजाब, हरियाणा सोडला तर भारतात कुठेच शेतकर्यांचा उद्रेक झाला नाही. राहिला शरद पवार यांचा प्रश्न, तर आज जे कृषी विधेयक आले आहे, त्याचा ड्राफ्ट हा पवार हे कृषिमंत्री असतानाच तयार झाला होता. पवारांचा आत्मा शेती म्हणतात, मला ते माहित नाही. पण पवार यांचा आत्मा शेती आहे, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र आत्म्याची चर्चा राज्यसभेत सुरू असताना पवार साहेब गैरहजर का राहिले? असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला.</p><p>दिल्लीत ज्या आंदोलनाची सुरुवात झाली ती केवळ एमएसपीचा कायदा करा, या एकाच गोष्टीसाठी झाली होती, असे सांगत पटेल पुढे म्हणाले, एमएसपी चा कायदा करा या मागणीसाठी पंजाब, हरियाणा शेतकर्यांनी दिल्लीकडे कूच केली होती. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकाचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले आहे. भारतामध्ये शेतकर्यांना शेतीचे अर्थशास्त्र शिकवणारे शरद जोशी होते. त्या जोशी यांच्या सोबत काम केलेल्या माझ्यासारखे हजारो लोक आज देशात आहेत. त्या सर्वांनी फक्त राजू शेट्टी सोडून सर्वांनीच कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. तर एमएसपी स्वतंत्र कायदा हवा, तेवढीच मागणी पंजाब व हरियाणा येथील शेतकरी दिल्लीला आले.</p><p>सरकार त्या विषयावर जेव्हा चर्चा करण्यास तयार झाल्यावर, हेच आंदोलक म्हणतात तिन्ही कृषी विधेयक रद्द करा. एक मागणी मान्य करण्याऐवजी कृषी विधेयक रद्द करा, असे म्हणणे म्हणजेच आंदोलनात राजकारण सुरू झाले आहे. आंदोलनात शेती प्रश्नापासून भरकटलेली मंडळी आहेत. जर शेती प्रश्नावर हे आंदोलन टिकून राहिले असते, तर एकच राहली असती, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.</p>