<p><strong>मुंबई -</strong></p><p><strong> </strong>राज्यात आज 5 हजार 572 करोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 लाख 20 हजार 21 रुग्ण </p>.<p>हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 94.54 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज 3,018 नवे करोना रुग्ण आढळले. तर राज्यात आज 68 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा 2.56 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली.</p><p>आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 26 लाख 754 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 25 हजार 66 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 89 हजार 560 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 3 हजार 204 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 54 हजार 527 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 3,018 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 19 लाख 25 हजार 66 झाली आहे.</p>