संगमनेर | वार्ताहर | Sangmner
करोनामुळे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले, तरी प्रत्यक्षात शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसात शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी या वर्गाच्या निर्धारित अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्राच्या वतीने देण्यात आली आहे.