मुंबई | Mumbai
पुण्यातीत आज आगीची घटना घडली आहे. शहरातली शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील ४२ प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक घेतला पेट घेतला.
चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.