<p><strong>मुंबई - </strong></p><p>संजय राठोडच पूजा चव्हाणचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी </p>.<p>म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.</p><p>पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असे संजय राठोड यांनी सांगितले आहे.</p><p>यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, या सगळ्या बलात्कार्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे.</p><p>अतिशय दुर्दैवी आणि शरमेची गोष्ट आहे की महाविकास आघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांचे मंत्री, आमदार बलात्कार्यांना वाचवण्यासाठी पुढे आले, त्यांची एकी महाराष्ट्राने पाहिली. ही एकी भंडार्यात 11 निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला, 40 दिवस एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा दिसली नाही, असेही त्या म्हणाल्या.</p>