
मुंबई | Mumbai
मुंबईतील मालाड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.
आतापर्यंत या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे.