मुंबई - राज्यात आज 14 हजार 123 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 35 हजार 949 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बर्या झालेल्या रुग्णांचा आकडा 54 लाख 31 हजार 319 इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट 94.28 टक्कयांवर गेला आहे.
आज राज्यात 477 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना मृतांची रुग्णांची संख्या आता 96 हजार 198 इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर देखील 1.67 टक्के इतका झाला आहे.
राज्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या 57 लाख 61 हजार 015 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.