<p><strong>मुंबई -</strong></p><p> ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला </p>.<p>होता. त्यानुसार आता राज्यातील ग्रामपंचातींच्या आरक्षणाची सोडत पुढच्या आठ ते दहा दिवसांत घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.</p><p>आरक्षण आधी जाहीर करण्यात न आल्याने मतदानामध्ये 4 टक्के वाढ दिसून आली आहे असेही ते म्हणाले.</p><p>राज्यातील अनेक ग्रामपंचातयींमध्ये सध्या प्रशासक आहे. त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनातील अधिकार्यांकडे देण्यात आलेला आहे. एका अधिकार्याकडे चार-पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढच्या 8-10 दिवसांत घेऊन गावचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्याची सूचना जिल्ह्याधिकार्यांना दिली आहे. मात्र ग्रामसभा घेण्यास 31 मार्चपर्यंत मनाई असेल अस ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.</p>