<p><strong>मुंबई - </strong></p><p>केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला करोना प्रतिबंधक लसीचे मागणीपेक्षा कमी डोस मिळाले आहेत असा पुनरुच्चार आरोग्यमंत्री </p>.<p>राजेश टोपे यांनी केला आहे. दरम्यान, लस वितरणात कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केलेला नाही असे सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट करत टोपे यांचा आरोप फेटाळला आहे. </p><p>आता पुन्हा राजेश टोपे यांनी मागणीपेक्षा कमी लसीचा पुरवठा केल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला 17.50 लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. </p><p>आठ लाख आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे 10 लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे असे राजेश टोपे म्हणाले आहेत.</p>