अकोला | Akola
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने त्यांनी डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर
या वंचित आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना पळविल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
विदर्भातील अकोला येथे पत्रपरिषदेत ते बोलत होते. या दोन्ही कार्यकर्त्यांचं राजकारण औटघटकेच आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या जाण्यानं ना पक्षाला खिंडार पडलं, ना पक्षाचं नुकसान झाले.
शिर्डीचे पैसे चालतात. मग ?
मंदिरे न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अॅड.आंबेडकरांनी पुन्हा टीका केली. राज्य सरकारला शिर्डी, सिद्धीविनायकाचा पैसा चालतो. मग मंदिरे का चालत नाहीत? असा सवाल त्यांनी सरकारला केला.