जालना -
आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा, ओबीसींची जनगणनेची आवश्यकता आणि अनिवार्यता
आहे. काही आठवणी आणि काही वचने.. असं ट्विट भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच, 2021 ची जनगणना जातिनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावांमधून निघालेला आवाज राजधानीपर्यंत नक्कीच पोहचणार, याबद्दल काहीच शंका नाही असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना करावी या मागणीसाठी रविवारी (24 जानेवारी) जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकभेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून, ओबीसींची जनगणना आवश्यक असल्याची मागणी केल्याचे दिसून आले.