<p><strong>औरंगाबाद - Aurangabad : </strong></p><p>2 अब्ज रुपयांचा अपहार करण्याच्या तयारीत असलेल्या एएम न्यूज चॅनलचे व्यवस्थापक परमजित संधू, राजेश शर्मा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असताना आज एएम न्यूजच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरापासून मिळत नसलेल्या पगाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.</p>.<p>एम न्यूजच्या कर्मचाऱ्यांचा पगार मार्च 2020 पासून थकला आहे. कोरोनाच्या संकटकाळात काम करूनही पगार देण्यात आला नाही. </p><p>त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन व्यवस्थापनाची तक्रार केली.</p>.<p>यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्याकडेही निवेदन सादर केले आहे.</p><p>व्यवस्थापनाकडून तर्कशुद्ध प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचा-यांनी निवेदनाचा मार्ग निवडला आहे. लोकप्रतिनिधींना भेटून यासाठी व्यवस्थापनाला समज द्यावी असे निवेदन कर्मचारी करणार आहेत.</p>.<p>संपूर्ण लाॅकडाऊनमध्ये कर्तव्य बजावून देखील अद्याप व्यवस्थापन स्पष्ट प्रतिसाद देत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. कायदेशीर मार्गाने दाद मागण्यासाठी विचार सुरू आहे.</p>