मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. त्यातच महाराष्ट्र आणि बिहार सरकार मध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यात उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट द्वारे अप्रत्यक्षरित्या मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे,"ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही." असे त्यांनी म्हंटले आहे.
अमृता फडणवीस नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यांनी हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्यांना नागपूर ला परत जाण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी त्यांची असलेली मुंबई पोलिसांची सुरक्षा काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.