<p><strong>मुंबई । प्रतिनिधी</strong></p><p>यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली.</p>.<p>भिंवडीचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग धारकांच्या शिष्टमंडळाने आज अस्लम शेख यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यावेळी बोलताना शेख यांनी समिती नेमण्याचा निर्णय घेतला.</p><p>यंत्रमाग धारकांनी अस्लम शेख यांना दिलेल्या निवेदनात यंत्रमाग उद्योगाची परिस्थिती पाहता किमान टाळेबंदी काळातील वीज बिलामध्ये सवलत मिळणे, यार्नचे भाव स्थिर ठेवणे, भिवंडीमध्ये कापड मार्केट तसेच यार्न मार्केट उभारणे, ‘टीयूएफ’योजने अंतर्गत रिपेअर लूम लावलेले यंत्रमागधारकांचे कर्जावरील व्याजास सवलत आणि भिवंडीमध्ये टेक्सटाईल पार्क निर्माण करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.</p>