<p>मुंबई | Mumbai </p><p>लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे दाखल झाले आहेत. </p> . <p>३७ हजार ४२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.</p><p>राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २६ सप्टेंबर या कालावधीत</p><p>पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६४ (८९५ व्यक्ती ताब्यात)</p><p>१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार २९३</p><p>अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७</p><p>जप्त केलेली वाहने – ९६, ४३०</p><p>करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील</p><p>२१७ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २४१ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.</p><p>पोलिसांना करोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.</p><p>करोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.</p>