<p><strong>नवी दिल्ली - </strong></p><p>भारतात शनिवारपासून (16 जानेवारी) करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी एकूण 1 लाख 91 हजार 181 </p>.<p>लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्यांपैकी एकावरही लस टोचल्यानंतर साइडइफेक्ट किंवा इतर कोणत्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे भारतासाठी हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे.</p><p>लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांना अर्थात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्य दलातील कर्मचार्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 3 कोटी लोकांना लस देण्याची योजना केंद्राने आखली आहे. कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे.</p><p>कोरोनावरील लस या महामारीच्या विरोधात संजीवनी सारखं काम करेल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. मी अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत. कोरोनावरील ही लस संजीवनी म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.</p>