Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या१०९ वर्षांची झाली 'पंजाब मेल'; ट्रेनबाबत तुम्हाला काही माहितीये का?

१०९ वर्षांची झाली ‘पंजाब मेल’; ट्रेनबाबत तुम्हाला काही माहितीये का?

नाशिक | प्रतिनिधी

पंजाब मेल ही भारतील सर्वात जुनी ट्रेन म्हणून ओळखली जाते. या ट्रेनला नुकतेच १०९ वर्षे पूर्ण झाली. मुंबई ते पेशावर असा या ट्रेनचा प्रवास होता. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड असे या ट्रेनला संबोधित केले जाई. १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली…..

- Advertisement -

सुरुवातीला ‘पी आणि ओ स्टीमर्स’ मेलमधून आणले जायचे. साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालला. ब्रिटिश अधिकारी मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी अंतर्देशीय रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीत बसत…

पंजाब लिमिटेड निश्चित टपाला दिवशी मुंबईच्या ‘बेलार्ड पियर’ मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्ग सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे.

ट्रेनमध्ये सहा कारचा समावेश होता. तीन प्रवाशांसाठी आणि तीन टपाल व मालासाठी असत. प्रवासी डब्ब्यांतील प्रवाशांची क्षमता ९६ इतकी होती.

प्रथम श्रेणीच्या दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह डब्बे बनवले गेले होते. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी असल्याने गाडयांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा होत्या. यात लॅव्हॅटरीज, बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, सामानासाठी एक डबा आणि एक डबा नोकरांकरीता असे.

फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटीश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता. पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून मार्ग जात होता.

१९१४ पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे या गाडीची दररोज सेवा सुरू झाली.

उच्च वर्गाच्या गो-या साहेबांच्या सेवेपासून पंजाब मेलने लवकरच निम्न वर्गातही सेवा पुरवायला सुरुवात केली. १९३० च्या दशकाच्या मध्यात पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डब्बे दिसू लागले. १९१४ मध्ये, मुंबई ते दिल्ली हा जीआयपी मार्ग सुमारे १,५४१ किमीचा होता. हे अंतर ही ट्रेन २९ तास व ३० मिनिटात पूर्ण करीत होती.

१९२० च्या दशकाच्या सुरूवातीला अठरा मधले थांबे असूनही प्रवासाची वेळ कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आली. १९७२ मध्ये, प्रवासाची वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढविण्यात आली. २०११ मध्ये पंजाब मेल मधे तब्बल ५५ मधले थांबे आहेत. सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला. १ मे १९७६ पासून पंजाब मेल डिझेल लोकोमोटिव्हसह चालविण्यात येऊ लागली.

थळ घाटाच्या विद्युतीकरणानंतर, रेल्वे बॉम्बे ‘व्हीटी ते मनमाड ‘पर्यंत ‘इलेक्ट्रिकवर’ चालविण्यात येऊ लागली, तेथून ‘डब्ल्यूपी क्लास स्टीम इंजिनने’ चालविण्यात येत होती.

१९६८ मध्ये सदर ट्रेन झांसीपर्यंत डिझेल वर चालविली जाऊ लागली तसेच लोडिंग १२ पासून १५ डब्ब्यांपर्यंत वाढले. नंतर झांसी ते नवी दिल्ली, त्यानंतर १९७६ मध्ये फिरोजपूर पर्यंत वाढविण्यात आले.

झाशी येथे दोन डब्ब्यांची भर पडत डब्ब्यांची संख्या १८ करण्यात आली. १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धात, पंजाब मेल चालविण्यासाठी ‘डब्ल्यूसीएएम/1 ड्युअल करंट लोकोमोटिव्ह इगतपुरी’ येथे डीसी ते एसी ट्रॅक्शन बदलून भुसावळ पर्यंत ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर’ चालविले जात होते.

पंजाब मेल मुंबई ते फिरोजपूर ‘कँटोन्मेंट’ दरम्यान १९३० कि.मी. चे अंतर कापण्यासाठी ३४ तास आणि १५ मिनिटे घेते.

आता रेस्टॉरंट कारची जागा पेंट्री कारने घेतली आहे. सध्या विशेष पंजाब मेलमध्ये एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ ‘पेंट्री कार’, ५ सामान्य द्वितीय आसन श्रेणीचे डब्बे आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या