…सरणावर ठेवलेल्या आजीबाई झाल्या जिवंत!

कन्नड तालुक्यातील घटना
…सरणावर ठेवलेल्या आजीबाई झाल्या जिवंत!

औरंगाबाद - Aurangabad

कन्नड (Kannada) तालुक्यातील अंधानेर गावात सोमवारी एक विचित्र घटना घडली, डॉक्टरने मृत घोषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आणून महिलेला सरणावर ठेवल्यावर डोळ्यावर पाणी पडताच ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जीजाबाई गोरे असे या 80 वर्षीय वृध्द महिलेचे नाव आहे.

कन्नड शहरातील जीजाबाई गोरे यांचे सोमवारी दुपारी निधन झाल्याची माहिती नातेवाईक, मित्र व गावकऱ्यांना देण्यात आली व संध्याकाळी 7 च्या सुमारास अंत्यविधीची तयारी करून अंत्ययात्रा काढण्यात आली. यांनतर स्मशानभूमीत रचलेल्या सरणावर जिजाबाई यांचा देह ठेवण्यात आला. अंत्यसंस्कार ची संपूर्ण तयारी करून शेवटी पाणी पाजून अग्नी देण्याचा विधी सुरु करण्यात आला.

तेव्हा जिजाबाई यांच्या पापण्यावर पाणी पडताच पापण्या व हात हलल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले व त्वरित पुढील विधी थांबविले. त्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्यांना चितेवरून खाली उतरविले आणि त्वरित कन्नड येथील डॉ. मनोज राठोड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की जीजाबाई यांचे हृदय सुरू असून त्यांचा ब्रेन डेड झाल्याने कोमात गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले व त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com