Friday, April 26, 2024
HomeUncategorizedग्रामपंचायत, पंचायत समित्या व जि. प. ला मिळणार भरीव निधी

ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जि. प. ला मिळणार भरीव निधी

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन जवळपास दीड हजार म्हणजे १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत (अनटाईड) निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisement -

हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला असून तेथून तत्काळ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. या निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकूण ५,८२७ कोटी रूपये निधी मंजूर आहे.

यापैकी याआधी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत निधी तसेच १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी असा एकूण २,९१३ कोटी ५० लाख रुपये इतका निधी पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त झाला होता.

हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना विकास कामांवर खर्च करण्यासाठी यापुर्वीच वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्र्यांनी दिली.

आता दुसऱ्या हप्त्यापोटी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त झाला असून तो आज जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला आहे.

तेथून पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना हा निधी तत्काळ वितरीत करण्यात येईल. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत ४,३७० कोटी २५ लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या