Friday, April 26, 2024
HomeUncategorized'रोहयो'त औरंगाबाद राज्यात अव्वल!

‘रोहयो’त औरंगाबाद राज्यात अव्वल!

औरंगाबाद (Aurangabad)

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने (Employment Guarantee Scheme) अंतर्गत सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्या बाबतीत राज्यात औरंगाबादने(Aurangabad) पहिला क्रमांक पटकावला असून जिल्ह्याने तब्बल 252 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

- Advertisement -

पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोण?

राज्य शासनाच्या या मोहिमेत मनुष्य दिवस निर्मिती म्हणजेच जास्त दिवस काम उपलब्ध करून देण्यात औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर (Solapur) असून या जिल्ह्यात 187 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

परभणी जिल्हा (Parbhani District) तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 177 टक्के उद्दिष्ट पूर्ती केली आहे. तर लातूर जिल्ह्याने 158 टक्के आणि नांदेड जिल्ह्याने 149 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले असून पुढील वर्षी हे उद्दिष्ट पाच पटींनी वाढवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या