Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविरोधकांच्या अपप्रचाराला थारा देऊ नका- सुभाष देसाई

विरोधकांच्या अपप्रचाराला थारा देऊ नका- सुभाष देसाई

औरंगाबाद – aurangabad

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेने संभाजीनगर (Sambhajinagar) शहराचा कायापालट केलेला आहे. आजघडीला रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, नियमित बस सेवा, नाट्यगृहे, सुरक्षा यासारख्या कितीतरी गोष्टींवर काम झाले असून शिवसेनेच्या या कार्यामुळे विरोधकांचे पोटशूळ उठत आहे. लोकांना भडकवण्याचे काम विरोधक करत आहेत. विविध मार्गाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विरोधकांना धडा शिकवण्याचे आदेश या ठिकाणच्या (police) पोलीस प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांना देखील पाणीप्रश्नी दिलासा मिळावा म्हणून जोपर्यंत समाधानकारक पाणी देऊ शकत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सबुरीने घ्या, शिवसेना आपल्या विश्वासास कधीच कमी पडणार नाही, अशी ग्वाही औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Guardian Minister Subhash Desai) यांनी दिली.

- Advertisement -

श्री मंगळग्रह मंदिरात भाविक, पर्यटकांसह पक्ष्यांनाही मिळतेय शांती

टीव्ही सेंटर (TV Center) हडको येथील छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयोजित तीन दिवसीय शंभूराजे महोत्सवात पालकमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई ,संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संयोजक तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, हभप नवनाथ महाराज आंधळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हिंदू जगू शकले, अन्यथा सुन्नत झाली असती. आज काही अक्करमाशी लोक त्या औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होताना आपण पाहत आहोत. शिवसैनिकांसह राष्ट्रप्रेमी लोक त्यांचा निषेध करतात.

वर्ष १९८६ मध्ये बाळासाहबांनी याठिकाणच्या जनतेला विचारले, औरंगजेब तुमचा कोण होता, तेव्हा जनतेने तो आमचा कोणी नव्हता अशी गर्जना केल्यावर साहेबांनी या शहराला संभाजीनगर असे नाव दिले. सत्ता आल्यावर त्यांनी संभाजीनगर असे नामकरण करण्याचे आदेश दिले पण कोर्टात हा विषय अडकला. जे त्या औरंग्याच्या थडग्यासमोर नतमस्तक होतील त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील असा शाप औरंगाबादकर देत आहेत. आम्ही औरंगाबादच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आणि काही लोक विनाकारण रान उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांची माथी फिरवण्याचे उद्योग करत आहेत’, असाही टोला त्यांनी लगावला. पाणीपट्टी अर्ध्यावर आज मी व्यक्तिशः पाणीप्रश्नी विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली. समन्यायी पाणी वाटप करण्याच्या सूचना देताना जोपर्यंत आपण नागरिकांना पुरेसे अर्थात समाधानकारक पाणी देऊ शकत नाही तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के म्हणजेच दोन हजार वर्षाला घेण्याचे आदेश दिले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे अतिशय समर्पक असे काम करत आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे, एक आठवड्यात पंधरा दशलक्ष लिटर पाण्याची वाढ संभाजीनगरला मिळणार आहे. यावेळी संयोजक तथा आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे महोत्सवाचा लाभ घेणाऱ्या संभाजीनगरवासीयांचे आभार मानले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, सहसंपर्क संघटक सुनिता देव, उपजिल्हा संघटक मीना फसाटे, जयश्री लुंगारे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, उपशहर प्रमुख संदेश कवडे, सुरेश कर्डिले मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, राजू इंगळे, किशोर नागरे, धर्मराज दानवे, ज्ञानेश्वर शेळके, गौरव पुरंदरे आदी उपस्थित होते.

गंध मराठी मातीचा’वर रसिक फिदा

यावेळी आरती क्रिएशन प्रस्तुत ‘गंध मराठी मातीचा’ या महाराष्ट्राच्या लोकनृत्यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘पहिले नमन करितो वंदना’ या गीताने झाले. ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ आणि जात्यावरच्या ओवी सादर करण्यात आल्या. ‘माझ्या राजाचे राजपण कालपण, आजपण, उद्यापण’ या छत्रपती शिवरायांवर आधारित गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. नागपूरहून आलेल्या महिला कलावंतांनी यावेळी बैठकीची व खडी लावणी सादर केल्या. बतावणी या सदरात कलावंतांनी एकाहून एक विनोद करत उपस्थितांना खिळवून ठेवले. ‘श्रावणाचे ऊन मला सोसेना’, ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा’ या लावण्यांना रसिक श्रोत्यांनी वन्स मोअर म्हणत दाद दिली. या कार्यक्रमाचे नियोजन आरती पाटणकर यांनी तर नृत्य दिग्दर्शन आकाश वाघमारे, उमेश चाबुकस्वार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या