अर्णब गोस्वामी यांना अटक करून चौथ्या स्तंभावर हल्ला

औरंगाबाद भाजपा आक्रमक
अर्णब गोस्वामी यांना अटक करून चौथ्या स्तंभावर हल्ला

औरंगाबाद -

महाराष्ट्र सरकारने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मीडियावर गळचेपी करण्याचे काम केले आहे. रिपब्लिक टीव्ही चे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना सकाळी घरातून अटक केली व आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. भाजप संभाजीनगर तर्फे...

क्रांतीचौक येथे या अटकेच्या निषेधार्थ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष संजय जी केणेकर, आमदार अतुल जी सावे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज जी पांगारकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिलजी मकरीये, संघटन सरचिटणीस राजेश जी मेहता, सरचिटणीस समीर जी राजूरकर, सरचिटणीस शिवाजी दांडगे पाटील, राजगौरव जी वानखेडे, सौ सविता ताई कुलकर्णी, सौ माधुरी ताई अदवंत, सौ अमृता ताई पालोदकर यांनी केले. या आंदोलनात सर्व मोर्चे, आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, सोशल मीडिया पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com