Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभगर विक्रेत्यांवर कारवाई सुरू 

भगर विक्रेत्यांवर कारवाई सुरू 

औरंगाबाद – aurangabad

नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri Festival) खरेदी केलेल्या भगर व भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे दीडशे लोकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याप्रकरणी पोलिसांकडून (police) कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर (Vaijapur) पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

- Advertisement -

सकाळची भगर संध्याकाळी खाऊ नका-अन्न व औषध प्रशासनाची सूचना

वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कुलदीप सिद्धार्थ नरवडे यांनी यांच्या तक्रारीवरून एकूण आठ दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यात वैजापूर शहरातील सबका मलिक एक या दुकानाचे मालक रमेश गोरख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घायगाव आणि लोणी बु. येथील अशा एकूण ८ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार या सर्व दुकानदारांनी आपली दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचे माहीत असताना सुद्धा ग्राहकांना विकले.

ग्राहकांना विषबाधा

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर,गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना भगर खाल्याने विषबाधा झाली आहे. ज्यात वैजापूर तालुक्यातील ११८ गावकऱ्यांना भगरमधून विषबाधा झाली आहे. तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील पंचवीसपेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील बारापेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या