औरंगाबाद – Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 45769 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 40 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47160 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1240 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (35)
नक्षत्रवाडी (02), बीड बायपास (01), क्रांती चौक (01), आरेफ कॉलनी (01), गजानन कॉलनी (01), जटवाडा रोड (01), एन नऊ एम दोन (01), शालिमार बाग (01), एन चार सिडको (01), एसबीआय क्वार्टर (01), गारखेडा (01), सुराणा नगर (01), एन एक सिडको (01), पद्मपुरा (01), पडेगाव (01), अन्य (19)
ग्रामीण (05)
खामगाव, फुलंब्री (01), अन्य (4)
एका बाधिताचा मृत्यू
घाटीत कन्नड तालुक्यातील शिवाजी नगर येथील 42 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.