Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादला इलेक्ट्रिक वाहनांसाठी १० चार्जिंग सेंटर

औरंगाबादला इलेक्ट्रिक वाहनांसाठी १० चार्जिंग सेंटर

औरंगाबाद – Aurangabad

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन धोरण स्वीकारले आहे. महापालिकेनेही या धोरणानुसार काम करण्याचे ठरविले असून त्यासाठी टाटा मोटर्स, टाटा पॉवरच्या मदतीने शहरात दहा चार्जिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक हा विषय सध्या चर्चेत आहे. इंधनाच्या वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे. या दोन्हीही प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात देखील या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. या बद्दल पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माहिती दिली. लवकरच महापालिका टाटा पॉवर बरोबर सामंजस्य करार करेल. चार्जिंग सेंटर उभारल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने नागरिकांना वाहने मोफत चार्ज करुन दिली जाणार आहेत.

एका वाहनाचे चार्जिंगग करण्यासाठी तीस युनिट वीज लागते. पंधरा ते वीस रुपये प्रती युनिट या दराने वाहनाचे चार्जिंग करुन दिले जाते. सहाशे ते सातशे रुपयात वाहन पूर्णपणे चार्ज होते आणि तीनशे किलोमीटरपर्यंत सहज चालते. कमी पैशांत जास्त किलोमीटर प्रवास करण्याची संधी यातून मिळणार आहे, प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या