Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमास्क न वापरणार्‍या २१ जणांवर पोलिसांची कारवाई

मास्क न वापरणार्‍या २१ जणांवर पोलिसांची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस आयुक्तांनी आदेश काढुनही गर्दीत मास्कचा वापर न करणाऱ्या २१ नागरिकांना पोलिसांनी कायद्याचा दणका दिला. या नागरिकांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणाऱ्या मास्कला शहरात बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तसे आदेश काढले आहे. संचारबंदी काळात घराबाहेर पडण्यास मनाई असली तरी अत्यावश्यक बाबींची खरेदीसाठी मास्क लावून जाता येते. परंतु या ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्यानेपोलीस हतबल झाले आहेत.

घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असल्यास करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुर्दैवाने याचे महत्त्व आजही अनेक नागरिकांना नाही. तोंडास मास्क अथवा रूमला न बांधता हे नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनमध्ये पोलिसांनी कारवाई केली. ११ आणि १२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कारवाईत २१ जणांवर १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ दोनमधील सातपूर, इंदिरानगर, अंबड, नाशिकरोड, उपनगरसह देवळाली कँम्प पोलिस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई आणखी कडक करण्यात येणार असून, नागरिकांनी मास्क घालुनच घराबाहेर पाडावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या