पारावरच्या गप्पा : समाजाची मानसिकता बदलावी लागेल

पारावरच्या गप्पा : समाजाची मानसिकता बदलावी लागेल

(गावातली सगळी पोर गप्प बसलेली)

रंग्या : अरे तुम्हाला कळलं का? त्या हैदराबादच्या घटनेबद्दल?
दाम्या : हो, कळलं यार ..खूप संताप होतोय? अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचला पाहिजे.
तान्या : पण आपण काय करणार अशावेळी?
दाम्या : आपण ना? आपण फक्त मेणबत्या जाळायच्या ..बस्स ..दुसऱ्या दिवशी रोजच रुटीन सुरु?
हे कधी थांबायचं ?

रंग्या : अगदी खरंय आपण फक्त सोशल मीडियावर बोलतो, निषेध करतो. श्रद्धांजलीपुरता …
दाम्या : किती दिवस सोशल मीडियावरून संताप करणार, रस्ते भरून मोर्चे काढून निषेध करणार?
पाटलाच्या तुक्या : काय रे पोराओ काय झालंय? खूपच रंगात दिसताय तुम्ही ?
दाम्या : तात्या , तुम्ही कालची बातमी वाचलीच असलं. अहो किती दुर्दैवी घटना घडली त्या मुलीसोबत..

पाटलाच्या तुक्या : व्हय म्या वाचली तर .. काळजात चर्रर्र झालं र .. आपल्या समाजातही इतकी घाण मानसिकतेची लोक राहतात?
दाम्या : तात्या, माणसांत माणुसकी राहिली नाही ओ जो पर्यंत कठोर शासन होत नाही तो पर्यंत हे, असं होतं राहणार..उगाच बेटी बचाव आपण नारा देत आलोय…
रंग्या : खरं हाय, अशांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी कायदाही कठोर व्हायला हवा, यापुढे कोणताही माणूस असे कृत्य करणार नाही.

तान्या : खरंच काय त्या मुलीचा दोष होता, अशा अनेक निर्भया आज बळी पडत आहेत. पण निषेध नुसता सोशल मीडियापुता मर्यादित न राहता त्याच न्यायाच्या रूपांतर झालं पाहिजे.
भग्या : खरंय नुसत्या मेणबत्या जाळून आणि मोर्चे काढून काय होणार, लोकांना नुसतं वाईट वाटून काय होणार , यात बदल व्हायला, हवा आपण नुसते म्हणतो भारत युवकांचा देश आहे, मग नुसतं सोशल मीडियावर निषेध करण्यापुरता युवक नकोय, न्यायासाठी लढणारा युवक हवा आहे.

रंग्या : व्हय, प्रत्येक मुलगी हि आपली जबाबदारी आहे असं युवकांनी वागायला हवं..
पाटलाच्या तुक्या : तरुणांची जबाबदारी आहेच पण मुलींनीही आपल्या स्वसंरक्षणासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवे. यासाठी भाऊ, वडील, नवरा यांनी पुढाकार घेत तिला स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे.
दाम्या : अगदी खरंय, महिला शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. तसेच महत्वाचे म्हणजे समाजात सुद्धा बदल आवश्यक आहे.

पाटलाच्या तुक्या : हो समाजात बदल घडण आवश्यक आहे. कारण अत्याचार करणाऱ्यांना समाजाचा, सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नसल्यानं अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय.. मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्याची गरज आहे… निर्भयपणे वावरता यावं यासाठी वातावरण तयार करावं लागेल, आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल…याकामी अर्थातच पुरुषांना पुढाकार घ्यावा लागेल…

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com