Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरिलायन्स जिओने महाराष्ट्रात ३ कोटी मोबाइल वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला

रिलायन्स जिओने महाराष्ट्रात ३ कोटी मोबाइल वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला

महाराष्ट्रात जिओचा दबदबा कायम ; जानेवारी मध्ये जिओची सर्वाधिक ६.३३ लाख वाढ :  ट्राय

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

पुन्हा एकदा रिलायन्स जिओने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. जानेवारी २०२० मध्ये ऑपरेटरने उर्वरित महाराष्ट्रात (मुंबई वगळता) ३ कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली.३ कोटींचा टप्पा गाठणारा महाराष्ट्र हे पहिले जिओ राज्य आहे. दूरसंचार नियामक, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जाहीर केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२० च्या अखेरीस महाराष्ट्रात ७.७५ लाख मोबाइल वापरकर्त्यांची वाढ झाली आहे.

सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक ६.३३ लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर बीएसएनएल १.२२ लाख आणि भारती एअरटेलच १.१५  लाख वापरकर्त्यांसह वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाने १.२६ लाख वापरकर्त्यांची नकारात्मक घट  नोंदविली आहे.
घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात ३.९५ कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर जिओ ३.०५ कोटी ग्राहक, भारती एअरटेल १.६ कोटी आणि बीएसएनएल ७२ लाख ग्राहक आहेत.

डिसेंबर २०१९ मध्ये असलेल्या ९.२६ कोटी सबस्कायबर्स मध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून ७.७६ लाखाची भर पडली असून जानेवारीमध्ये स्बस्क्राइबर्स ९.३३ कोटीवर पोहोचले आहेत.  जानेवारी  महिन्यात, केवळ जिओ आणि बीएसएनएलमध्ये डिसेंबर २०१९ च्या तुलनेत २% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. एअरटेलची वाढ १% पेक्षा कमी झाली आहे तर व्होडाफोन आयडियामध्ये  घट   झाली आहे.

सध्या, व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांचा सर्वाधिक वाटा ४२.३५% आहे आणि ३२.६८ शेअरसह जिओ दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर भारती एअरटेलचा वाटा सुमारे १७% आणि बीएसएनएलचा ७.७५ टक्के होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या