Friday, April 26, 2024
Homeनाशिकपहिल्याच दिवशी २९ रिक्षांवर कारवाई

पहिल्याच दिवशी २९ रिक्षांवर कारवाई

नाशिक ।प्रतिनिधी

शहरातील प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे आकारणी न करणार्‍या २०० रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून पहिल्याच दिवसापासून कारवाई करण्यात आली. आरटीओच्या एका पथकाद्वारे २०० रिक्षा तपासण्यात आल्या. त्यापैकी २९ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन आधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.

- Advertisement -

ठराविक रिक्षा चालकांकडून मनमानी व रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा यामाध्यमातून सुरू असलेली भाडे आकारणीची दखल पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओे) घेतली आहे. शहरात आता नव्याने मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा आग्रह पोलिस प्रशासनाकडून धरण्यात आला. पोलिसांपाठोपाठ आता प्रादेशिक परिवहन विभागही बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरला आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही दोन पथके शहरातील काही मार्गांवर कारवाईसाठी उतरविण्यात आली.

या पथकांनी दिवसभरात सुमारे २०० रिक्षांची तपासणी केली असून त्यामध्ये २९ रिक्षाचालक नियमबाह्य पध्दतीने प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ठरलेल्या मार्गांवर मीटरप्रमाणे तसेच शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक होत नसल्याचे आढळून आले. अशा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन आधिकारी विनय आहिरे यांनी दिली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाने या संदर्भात रविवारी नाशिकरोड बसस्थानकाजवळ रिक्षाचालकांना मार्गदर्शन आंणि आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या