नाशिक | प्रतिनिधी
आपल्याला मिळालेली वर्दी आपल्या आई वडिलांच्या मेहनतीनंतर आणि आपल्या खडतर प्रशिक्षणानंतर मिळाली आहे. त्या वर्दीवर कोणताही डाग, कलंक लागू देवू नका असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या सत्र क्र. ११७ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन सोहळ्यात बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नातलगांची उपस्थिती होती.