मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुढील दोन दिवसांत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुढील दोन दिवसांत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सध्या राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाले असून आता कुणाकडे काय यावर जोरदार चर्चा चालू आहे. परंतु लवकरच खातेवाटपाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर अखेर राज्यात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यातील जनतेचे लक्ष मंत्रिमंडळ विस्तारावर लागले असून कुणाला कोणते मंत्रालय मिळणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय पुढील दोन-तीन दिवसांत करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

विधानसभेच्या दोन अधिवेशनानंतर राज्यात ठाकरे सरकार जोमानेकामगाजाला सुरुवात केली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दोन बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही सर्वोतपरी निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com