Friday, April 26, 2024
Homeनगरराज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान- खा. सुळे

राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान- खा. सुळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. जे झाले ते दुदैवी आहे. त्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त होणारच, अशी प्रतिक्रीया खा. सुप्रिया सुळे यांनी अहमदनगरमध्ये दिली.

- Advertisement -

एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शेतकरी उत्पादक मेळावास त्या सोमवारी नगरमध्ये आल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आ. संग्राम जगताप आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी व्यक्त केलेले मत तसेच राज्यपालांची महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतची भाषणाची व्हायरल झालेल्या क्लिपनंतर राज्यातून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी राज्यपालांचा निषेध व्यक्त होणारच, कारण हा महाराष्ट्रचा अपमान आहे. असे म्हटले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात परत आणले जात असताना पंतप्रधान किंवा भाजप घेत असलेल्या श्रेयावरही खा. सुळे यांनी टीका केली. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनीही हजारो लोकांना देशात सुरक्षित आणले होते. मात्र त्यासाठी त्यांनी श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मात्र सध्या अशाही गोष्टींत श्रेय घेणे हे दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या