Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु होणार?

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु होणार?

मुंबई | Mumbai

करोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उद्योग, वाहतूक या सारख्या जवळपास सर्वच बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिरे आणि शाळा अजूनही बंद आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच सुरू झाले आहे. मात्र, त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. करोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचेही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. या शाळा सुरू करत असताना सरकारच्या वतीने एक चांगले धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही करोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिले जाईल, अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतली आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच बाधित मुले शाळेत येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची करोना चाचणी करता येईल का? असाही विचार सुरू असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या