<p><strong>नाशिक | प्रतिनिधी </strong></p><p> ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भव्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना आयाेजकांकडून संमेलनस्थळी सर्व शक्यता पडताळून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययाेजना कराव्या लागतील यावर उहापाेह सुरू केला आहे...</p> .<p>या संदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीत संमेलनाच्या दृष्टीने येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्कालीन समस्यांवर चर्चा झाली. आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. </p><p>त्यानुसार सर्वप्रथम मेडिकल इमर्जन्सी, फायर ब्रिगेड, ओन कॉल सर्व्हिस आणि जवळील हॉस्पिटल यांच्या समवेत टायप करणे व १० इमर्जन्सी बेड तयार करणे संदर्भात चर्चा झाली. संमेलनाच्या दृष्टीने प्रत्येक गेटवर रूग्णवाहिका, कार्डीयाक, प्रथमोपचाराची सोय असणे आवश्यक आहे असे सर्वानुमते ठरले आहे. </p><p>संजय भडकमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ही बैठक पार पडली. संमेलनाचे पालकत्व श्याम पाडेकर व मुख्य समन्वय शविश्वास ठाकूर यांनी दिलेल्या कार्यप्रणाली प्रमाणे संपन्न झाली. सभासद निलेश तिवारी (उपप्रमुख) मोनल नाईक (उपप्रमुख) तसेच अमित शहा, मिलिंद पत्की, डॉ. राजेंद्र नेहेते उपस्थित होते.</p>