Tuesday, May 14, 2024
HomeमनोरंजनDagdi Chawl 2 : 'राघू पिंजऱ्यात आला' गाण्यावर थिरकरणार अवघा महाराष्ट्र

Dagdi Chawl 2 : ‘राघू पिंजऱ्यात आला’ गाण्यावर थिरकरणार अवघा महाराष्ट्र

मुंबई | Mumbai

‘दगडी चाळ २’ (dagdi chawl 2) हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे समोर आले आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे…

- Advertisement -

‘राघू पिंजऱ्यात आला’ असे या गाण्याचे बोल असून ‘डेझी शाह’ (Daisy Shah) या बॅालिवूडमधील (Bollywood) चेहऱ्याने गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत (Marathi Cinema) पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे.

तर अवघ्या बॉलीवूडला (Bollywood) आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सीझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणाले की, जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला.

हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.”

राज्यात अतिवृष्टीचा इशारा; नाशिकसह ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

संगीतकार अमितराज म्हणाले की, क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने.

हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या