Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजन'या' मालिकेच्या दिग्दर्शकावर आली भाजीपाला विकण्याची वेळ

‘या’ मालिकेच्या दिग्दर्शकावर आली भाजीपाला विकण्याची वेळ

आझमगड- Azamgarh

देशभरामध्ये लॉकडाऊनचा परिणाम सिनेक्षेत्रावरही पडला आहे. बालिका वधूचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. उदरनिर्वाहासाठी रामवृक्ष गौड भाजी विक्रीचे काम करत असून, हे काम करण्यात काहीच कमीपणा वाटत नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

’मी आझमगडला एका चित्रपट दिग्दर्शनासाठी आलो होतो. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे परत मुंबईला नाही जाऊ शकलो. तसेच, ज्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आलो होतो. तो चित्रपट यावर्षी होऊ शकणार नाही, असे निर्मात्याने सांगितले. त्यावर मग मी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. माझे वडील हे भाजीविक्रते होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या