Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनAkshay Kumar : अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला...

Akshay Kumar : अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला…

नवी दिल्ली | New Delhi

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. मात्र, आज तो एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय कुमारला आज स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी भारताचे नागरिकत्व मिळाले आहे…

- Advertisement -

MahaVikas Aghadi : शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम; ‘राष्ट्रवादी’ शिवाय निवडणूक लढण्याबाबत चर्चा

याबाबतची माहिती त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) पोस्ट शेअर करत दिली आहे. याआधी अक्षय कुमारकडे कॅनडाचे (Canada) नागरिकत्व होते. त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. यानंतर आता अक्षयला भारताचे नागरिकत्व ( Indian citizenship) मिळाले असून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

दरम्यान, अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर भारताच्या नागरिकत्वाच्या कागदपत्रांचा फोटो शेअर केला असून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!” असे लिहिले आहे. अक्षयच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nawab Malik : शरद पवार की अजित पवार गट? नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला? समोर आली मोठी अपडेट

- Advertisment -

ताज्या बातम्या