सार्वमत
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची 3100वर पोहोचली आहे. आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आजाराला घाबरायचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
- Advertisement -
राज्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवत आहोत. आणखी वाढवायचं असून, एकूण 36 लॅब आपण उपलब्ध करून देतोय, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. 83 टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मृत्यू झाले आहेत, त्यांचे ऑडिट होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.