अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरामध्ये करोना प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांना बेड वेळेवर मिळत नाही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.
प्रशासनाकडून देखील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यादृष्टिने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. बैठकीत स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते तथा गटनेते संपत बारस्कर, मालन ढोणे, रोहिणी शेंडगे, सुप्रिया जाधव, संजय ढोणे, भाजपा मंडल अध्यक्ष अजय चितळे, सतीश शिंदे, सचिन जाधव, अनिल बोरूडे आदी उपस्थित होते.
शहरामध्ये विनाकारण फिरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून याबाबत कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे. कमी लक्षणे असणार्या रुग्णांनी मनपाने सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होऊन वेळीच योग्य ते उपचार घ्यावेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्या नागरिकांची रस्त्यावरच अँन्टीजेन टेस्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मांडल्या.