पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -
शेतकर्यांचे अवकाळी पाऊस, वादळ व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत
करावी. या मागणीचे निवेदन पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवस पाथर्डी तालुक्यामध्ये ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही गावांचे पंचनामे झाले; परंतु अजूनही नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे करण्याचे बाकी आहेत. येळी, फुंदेटाकळी, बडेवाडी, पिंपळगव्हाण, बोंदरवाडी पिंपळगव्हाण तसेच तालुक्यातील इतर गावातील पंचनामे करण्याचे बाकी आहे.तरी नुकसानग्रस्त गावाचे पंचनामे करून शेतकर्यांना तात्काळ मदत करण्यात द्यावी.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सहसचिव जालिंदर काटे, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाबभाई शेख, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन गरड, युवक काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता पाठक, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संजय कराड, सुधीर कराड, चंद्रकांत ढोले, अनिल साबळे, काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष गणेश दिनकर, अल्पसंख्यांक काँग्रेस उपाध्यक्ष असलम सय्यद, शिवसेनेचे अनिल फुंदे, फुंदेटाकळीचे अध्यक्ष अमोल फुंदे, अंबिकानगरचे उपसरपंच अशोक शिरसाट, येळीचे काँग्रेस सरचिटणीस कृष्णा सोळसे आदि उपस्थित होते.